चुकीची ऐकलेली गाणी

>> गुरुवार, २९ जानेवारी, २००९

माझी एक जुनी सवय आहे, की जर गाण्यातला एखादा शब्द किंवा वाक्य कळले नाही तर आपल्याला जे यमकाप्रमाणे बरोबर वाटतं ते बिनधास्त ठोकुन देणे. अशी काही चुकीची ऐकू आलेली गाणी खाली देत आहे ...
--------------------------------------------------------------------------------------------------
"देवदास" मधे एक गाणे आहे. "काहे छेड मोहे",त्या मधे माधुरी च्या आवाजातल्या काही ओळी आहेत. एक वाक्य ती म्हणते, "आहट सुन जियरा गयो धडक धडक धडक",..
ही ओळ मी बरेच दिवस,"आह ठुसुम जियरा गयो धडक धडक धडक" अशी म्हणायचे.
--------------------------------------------------------------------------------------------------
महानंदा या सिनेमातील एक गाणे...
मागे उभा मंगेश ..त्या मधे एक कडवे आहे।

जन्मजन्मांचा हा योगी, संसारी आनंद भोगी
विरागी की म्हणू भोगी
शैलसूतासंगे गंगा, मस्तकी वाहे

हे मला कसं ऐकु यायचं माहितिय?
जन्मजन्मांचा हा योगी, संसारी अनंत भोगी
विरा कीर्ती म्हणू भोंगी (भोंगी म्हणजे आमच्या सांगली कडे सिमला मिरची)
शैलसूतासंगे रंग, मस्तकी वाहे.

मला वाटायचं, की कसलं गाणं आहे, शंकराला "भोंगी" काय म्हणते?, आणि म्हणते ते म्हणते आणि वर डोक्यावरुन रंगाची गंगा का वाहवते?

----------------------------------------------------------------------------------------------

"सारेगमप लिटिल चॅम्प्स" मधल्या मुग्धा ने "एकविरा आई तू डोंगरावरी नजर हाये तुझी कोल्यावरी" .. हे गाण
"एकविरा आई तू डोंगरावरी नजर हाये तुझी कोल्ह्यावरी.. अस म्हणल होत । तिला अवधूत दादा ने नंतर सांगितले पण होते, की बाळा, ते "कोल्यावरी" असे आहे. आणि यावर माझा आणि माझ्या "अहों" चा बराच वाद झाला. त्याचं म्हणणं ते कोल्ह्यावरी च आहे. मी बरच सांगुन पाहिल की एकविरा ही कोळी लोकांची देवी आहे, त्यामुळे ते "कोल्यावरी" असे आहे. पण छे हो, पटायलाच तयार नाही त्याला. त्याच्या logic प्रमाणे,त्या देवीला बळी द्यायची पद्धत असेल आणि म्हणुन बळी साठी आणलेल्या "कोल्ह्यावर" तिची नजर असणारच...आता मला सांगा, कोंबडी, बकरा, अगदी जुन्या काळी रेडा पण बळी दिलेला ऐकलाय मी, पण कोल्हा बळी दिलेलं अजुन तरी कानावर आल नाही. तुम्ही ऐकलय का?
------------------------------------------------------------------------------------------------



Read more...

यू टर्न - अप्रतिम नाटक

>> बुधवार, २८ जानेवारी, २००९

नाटक अणि सिनेमे बघणे हा आपला आवडता उद्योग... त्यातल्या त्यात नाटक जरा जास्तच प्रिय आहे मला।
आणि माझ्या नशिबाने मला ती संधी अगदी लहानपणापासून मिळत गेली। मी मुळची सांगली ची, आणि सांगली "नाट्यपंढरी" म्हणुन ओळखली जाते हे उभ्या महाराष्ट्रात सगळ्यानाच माहीत आहे। अगदी ३-४ वर्षाची असल्यापासून मी संगीत नाटके बघत आले आहे। अर्थात तेव्हा काही कळायच नाही, पण छान वाटायच। त्यातली गाणी अपोआप पाठ होउन जात. कदाचित याच काळात नाटकान्बद्दल आवड निर्माण झाली असावी।

हा, तर फारसे न भरकटता मी मूळ मुद्द्यावर येते। सध्या मी पाहिलेल नवीन नाटक म्हणजे "यू टर्न"। डॉ गिरीश ओक अणि इला भाटे यांच्या प्रमुख भूमिकानी सजलेल हे नाटक खूप छान आहे। विषय आहे "उतारवयातील मैत्री" अर्थात "companionship"।

गिरीश ओक आहेत एक रिटायर्ड मेजर "सुधीर वैद्य"। ते मुंबई मधे रहातात . त्यांचा अणि त्यांची बायको स्वाति हिचा काही मतभेदान्मुळे घटस्फोट झाला आहे. त्याना एक मुलगी आहे , मधु। तिच लग्न झालेल आहे आणि ती सध्या बंगलोर ला असते। ती प्रेग्नंट आहे। मेजर तिच्या चिंतेत आहेत, कारण त्यांच्या मते जावई एकदम टुकार आहे.

इला भाटे या आहेत एक गृहिणी अणि दिवंगत ACP प्रभाकर गोखले यांच्या पत्नी रमा गोखले .त्या पुण्याला असतात. त्याना एक मुलगा आहे, साहिल, जो सोफ्टवेअर इंजिनियर आहे आणि लंडन मधे असतो।

मेजर आणि रमा या दोघांची भेट योगायोगाने होते. रमा या मुंबई ला एका मैत्रिणीकडे आलेल्या आहेत पण त्याना घराला कुलुप दिसते। व मैत्रिणीला फ़ोन केल्यावर त्याना कळते की तिला यायला अजुन अर्धा तास आहे. तो वेळ कुठे बसणार म्हणुन त्या समोरच्या घराची बेल वाजवतात। अणि ते घर असत मेजर सुधीर वैद्य यांच। हा माणूस जरा फटकळ आहे। त्यांना त्यांच्या मोर्निंग वोक च्या वेळी या बाई आलेल्या अजिबात आवडलेल नाही। ते गोखले बाई शी जरा उर्मटपणेच बोलतात । पण नाईलाजाने का होइना पण त्याना चहा बिस्किट्स देतात। बाई एकदम बोलक्या आहेत। त्याना नुसता चहा प्यायल्याने एसिडिटी होते वगैरे गोष्टी पण त्या बोलून टाकतात। दरम्यान मेजरच्या घरी एक फ़ोन येतो। त्यानी पेपर मधे दिलेल्या "companionship" च्या जहिरातिबद्दल एका बाई ना बोलायच असत। रमाने फ़ोन घेतला म्हणुन मेजर रागवतात। पण त्याच वेळी त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ही ठेवतात। त्यानंतर काही वेळाने, मैत्रिण आली म्हणुन रमाबाई निघून जातात। मेजर च फ़ोन नम्बर घेउन जातात व जाताना कृतद्न्यता म्हणुन त्याना घरी पुण्याला यायचे आमंत्रण ही देतात.

या रमाबाईना रोज रात्री डायरी लिहायची सवय आहे। त्या वेळी त्यांच्या लक्षात येत की चश्मा मुंबई ला च राहिला. त्या मेजर ना फ़ोन करून चश्मा ठेउन द्यायची विनंती करतात व पुढच्या वेळी घेउन जाइन असे सांगतात। तेवढ्यानेही हा माणूस वैतागतोच। म्हणजे बघा।

रमाबाई पुढच्या वेळी मानत काहीतरी विचार करून जातात। मेजर त्याना चहा अणि हो बिस्किट्स पण देतात। रमाबाईना त्यांची ही छोटीशी गोष्ट लक्षात ठेवली म्हणुन अप्रूप वाटत। तेवढ्यात पण "companionship" साठी मेजरना फ़ोन येतो। आणि रमाबाई "मैत्रिणीसाठी" म्हणुन त्याबद्दल काही प्रश्न विचारू लागतात। तेव्हा अचानक टीव्ही वर बातमी येते की लंडन मधे काहीतरी बोम्बस्फोट झाला आहे, आणि साहिल(रमाबाई चा मुलगा) जिथे काम करतो तिथेच झाला आहे। रमा बाई ना त्याचा फ़ोन लागत नाही। अशावेळी मेजर त्याना खूप मानसिक आधार देतात व स्वत:च्या सर्व ओळखी वापरून बाइंच साहिल शी बोलणे घडवून आणतात। या प्रसंगानंतर ते दोघे "companion" म्हणुन राहण्याचे ठरवतात.

त्या दोघांच्या मुलाना ते कधीच आवडत नाही। साहिल लग्न ठरवतो पण आईला बोलवत नाही। तर मधु बाळन्तपणासाठी मुंबई ला न येता आपल्या आईकडे जाते,तेही मेजर च्या इच्छेविरुद्ध। शेवटी दोघाना ही कळते की आपली मुलेच आपल्यासाठी महत्वाची आहेत। आणि ते या वेगळ्या ट्रेक वरून "यु टर्न" मारून परत आपल्या पहिल्या रस्त्याला लागतात.
------------------------------------------------------------------------------------------------
या नाटकामधे दोघांची कामे अप्रतिम झाली आहेत। पण मला शेवट जरासा खटकला . "ते मुलांच म्हणण मानून आपल्या आनंदाचा त्याग करतात" या ऐवजी "मित्र म्हणुन एकमेकांबरोबर रहाणे पसंत करतात" असा शेवट जास्त भावला असता असे वाटत। पण मग "यु टर्न" हे नाव सार्थ ठरल नसत म्हणा। असो, कसाही शेवट असला तरी नाटकाची संकल्पना चांगली आहे हे मान्यच...

तर तुमच्या गावात/ शहरात हे नाटक लागले तर अवश्य पहा.

Read more...

  © Blogger templates Palm by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP