गणेशोत्सव आणि जातीयवाद
>> शुक्रवार, ११ सप्टेंबर, २००९
गेले काही दिवस आपण सगळेच मिरजेतल्या धुमाकुळाच्या बातम्या ऐकतोय. प्रकरण कुठचं कुठे जाउन पोचलंय. आधी फक्त मिरजेत झालेल्या या वादावादीचे हे लोण आता सांगली, इचलकरंजी, आष्टा, कोल्हापूर आणि जवळपासच्या गावांमधे पसरलंय. अनेक हिंसक प्रकार झाल्यानंतर घोषित केलेल्या संचारबंदीमुळे गावांमधून शुकशुकाट आहे. पण या सगळ्या प्रकारामधे सामान्य नागरिक मात्र अडकला गेलाय. काही लोकांना मार खावा लागलाय तर काहींनी हकनाक आपले प्राण गमावले आहेत. शिवाय वाहने, घरे, दुकाने यांचं नुकसान झाले ते वेगळंच.
आपला देव ही यातून सुटला नाही. अनेक ठिकाणी मूर्ति भंग करण्याचे प्रकार घडले. मिरजेतले जे हिंदू भाग आहेत तिथे मांसाचे तुकडे टाकले गेले. मग यावर प्रतिक्रिया म्हणुन मुस्लिम धार्मिक स्थळांमधे मेलेले डुक्कर टाकण्यात आले. या सगळ्या जातीय भांडणांच नक्की मूळ काय आणि अंत कुठे आहे, हेच शोधणं अवघड होउन बसलंय आता. जिथे हे सगळे मुस्लिम बांधव जन्मापासून राहतायत, तिथेच त्यांनी "जय पाकिस्तान" सारख्या घोषणा द्याव्यात? म्हणजे ह्या लोकांनी ही भारत भूमि कधी आपली मानलीच नाही का जिने त्यांना आत्तापर्यंत आपल्या मुलांप्रमाणे माया दिली? असो.... सगळेच लोक असे नाहीत हे ही तितकंच खरं.. काही असंतुष्ट समाज कंटकांच काम आहे हे.
अनंत चतुर्दशीला होणारं गणपती विसर्जन या जातीयवादाच्या गोंधळामुळे शेवटी काल करण्यात आलं. आणि तरीही अजुन सांगली मधे संचारबंदी आहेच.. सगळे नागरिक कधी मोकळा श्वास घेणार आहेत ते परमेश्वरालाच ठाउक.
मुळात हे सगळ सुरु होण्यासाठी कारणीभूत ठरलेली ती कमान खरंच एवढी आक्षेपार्ह होती का? शिवाजी महाराजांनी अफ़झलखानाला मारतानाचा प्रसंग दाखवणे यात धार्मिक भावना दुखावण्यासारखं काय आहे? तो इतिहास आहे, आणि अर्थातच घडून गेलेली घटना आहे. असे दंगे करण्याने काय परिस्थिती बदलणार आहे थोडीच?
जे आहे ते आहे. त्याचा एवढा मोठा इश्यु करून कोणाचा फायदा झाला, हे ज्यानी ही दंगल सुरु केलीय तेच जाणे..
आता हे सगळं आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालय हा अजुन एक योगायोग.. शेवटी वाचकांनी या दोन गोष्टींचा संबंध आहे की नाही ते ठरवायचं आहे. होय, त्यांनी आपल्या संचार करायच्या स्वातंत्र्यावर तात्पुरती बंदी घातली असली, तरी विचार स्वातंत्र्यावर कुठे घातलीय? नाही का?
Read more...
आपला देव ही यातून सुटला नाही. अनेक ठिकाणी मूर्ति भंग करण्याचे प्रकार घडले. मिरजेतले जे हिंदू भाग आहेत तिथे मांसाचे तुकडे टाकले गेले. मग यावर प्रतिक्रिया म्हणुन मुस्लिम धार्मिक स्थळांमधे मेलेले डुक्कर टाकण्यात आले. या सगळ्या जातीय भांडणांच नक्की मूळ काय आणि अंत कुठे आहे, हेच शोधणं अवघड होउन बसलंय आता. जिथे हे सगळे मुस्लिम बांधव जन्मापासून राहतायत, तिथेच त्यांनी "जय पाकिस्तान" सारख्या घोषणा द्याव्यात? म्हणजे ह्या लोकांनी ही भारत भूमि कधी आपली मानलीच नाही का जिने त्यांना आत्तापर्यंत आपल्या मुलांप्रमाणे माया दिली? असो.... सगळेच लोक असे नाहीत हे ही तितकंच खरं.. काही असंतुष्ट समाज कंटकांच काम आहे हे.
अनंत चतुर्दशीला होणारं गणपती विसर्जन या जातीयवादाच्या गोंधळामुळे शेवटी काल करण्यात आलं. आणि तरीही अजुन सांगली मधे संचारबंदी आहेच.. सगळे नागरिक कधी मोकळा श्वास घेणार आहेत ते परमेश्वरालाच ठाउक.
मुळात हे सगळ सुरु होण्यासाठी कारणीभूत ठरलेली ती कमान खरंच एवढी आक्षेपार्ह होती का? शिवाजी महाराजांनी अफ़झलखानाला मारतानाचा प्रसंग दाखवणे यात धार्मिक भावना दुखावण्यासारखं काय आहे? तो इतिहास आहे, आणि अर्थातच घडून गेलेली घटना आहे. असे दंगे करण्याने काय परिस्थिती बदलणार आहे थोडीच?
जे आहे ते आहे. त्याचा एवढा मोठा इश्यु करून कोणाचा फायदा झाला, हे ज्यानी ही दंगल सुरु केलीय तेच जाणे..
आता हे सगळं आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालय हा अजुन एक योगायोग.. शेवटी वाचकांनी या दोन गोष्टींचा संबंध आहे की नाही ते ठरवायचं आहे. होय, त्यांनी आपल्या संचार करायच्या स्वातंत्र्यावर तात्पुरती बंदी घातली असली, तरी विचार स्वातंत्र्यावर कुठे घातलीय? नाही का?
Labels:
माझिया मना जरा सांग ना